Posts

Image
' प्रहार'    रविवार, दि.15 एप्रिल 2018 बंद करा हा दौलतजादा...! हे खरे आहे की देशातील गरिबांची काळजी घेणे सरकारचे कर्तव्य आहे आणि या गरीब, वंचितांपर्यंत सगळ्या सोईसुविधा घेऊन जाण्यासाठी सरकारला 'आहे रे' वर्गातील लोकांकडून अधिक कर वसूल करावा लागतो; परंतु ही व्यवस्था कायमस्वरूपी असू शकत नाही. पायात ताकद निर्माण होईल, चालण्याचा सराव होईल तोपर्यंत पांगूळगाडे दिले पाहिजे, अशी ताकद निर्माण झाल्यावर पांगूळगाडे काढून घेणे गरजेचे आहे, परंतु सध्या हे होत आहे, की या पांगूळगाड्यांनाच लोक पाय समजत आहेत आणि त्यांचा तो भ्रम कायम ठेवण्यात सरकार स्वत:ला धन्य मानत आहे. नुकतीच एक बातमी वाचण्यात आली. एअर इंडिया या सरकारी मालकीच्या विमान कंपनीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या विमान प्रवास भाड्यात अर्धी कपात केली आहे. याचा अर्थ ज्येष्ठ नागरिक अर्ध्या पैशातच विमान प्रवास करू शकतील. आधीच तोट्यात चालणाऱ्या या विमान कंपनीला अशा सवलती देणे कसे काय परवडते? प्रवासी आणि मालवाहतुक भाड्यात या विमान कंपनीने वाढ केली असती, कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि इतर भत्त्यांमध्ये कपात केली असती, भारतातल्या भार...

आपली किंमत वाढवणे आपल्याच हातात !

Image
*'प्रहार'*, रविवार दि. २८ अॉक्टोबर २०१८ *आपली किंमत वाढवणे आपल्याच हातात !* (लेखक : *प्रकाश पोहरे* मुख्य संपादक, दै. देशोन्नती) _शेतकऱ्यांनीच कुणावरच विसंबून न राहता अंतर्मुख होऊन विचार करावा. मागच्या प्रहारमध्ये मी सांगितल्या नुसार काहीतरी वेगळी संकल्पना राबविल्याशिवाय आता केवळ शेतीमध्ये गुजारा होऊ शकत नाही हे पक्के ध्यानी धरा आणि त्याकरिता हातपाय हलवायला आजच सुरुवात करा, अन्यथा नाकातोंडात पाणी गेलेले आहेच , आता बुडायला फार वेळ लागणार नाही._ न्यूयॉर्कच्या ब्रुक्लीन प्रांतातल्या झोपडपट्टीत मायकेल जॉर्डनचा जन्म झाला. त्याला चार बहिणी होत्या आणि त्यांच्या वडिलांची कमाई संपूर्ण कुटुंबासाठी पुरेशी नव्हती. त्यांचे शेजारी पण खूप गरीब होते. तिथल्या वातावरणात मायकेल जॉर्डनला त्याचे भविष्य अंध:कारमय दिसत होते. आत्मचिंतनात हरवलेल्या मायकेलला त्याच्या वडिलांनी पाहिले आणि त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. १३ वर्षाच्या जॉर्डनला वडिलांनी वापरलेला एक जुना कपडा दिला आणि त्याला विचारले "हा कपडा किती किमतीचा असेल?" जॉर्डन उत्तरला "अ...
Image
प्रहार रविवार, दि.8 एप्रिल 2018 ...अशा हिंसेने प्रश्न सुटतील? ज्या अॅट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भात दलित नेते खूपच आक्रमक झालेले दिसतात त्याच कायद्याने दलित आणि दलितेतरांमध्ये मोठी भिंत उभी केली आहे, ही दुर्दैवी वस्तुस्थिती मान्य करायलाच हवी. एरवी ज्या सामाजिक समरसतेच्या किंवा जातीअंताच्या बाता हे नेते करतात, जातीव्यवस्थेने आमच्यावर कसा अन्याय केला हे घसा खरवडून सांगत असतात, तेच नेते जेव्हा लाभाचा किंवा विशेष सुविधांचा संबंध येतो तेव्हा आपल्या जातीच्या अस्मिता कुरवाळतात. सर्वोच्च न्यायालयाच्या अॅट्रॉसिटी अॅक्ट म्हणजेच अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भातील निवाड्याचा निषेध करण्यासाठी नुकताच काही संघटनांनी भारतबंद पुकारला होता. खरे तर किमान महाराष्ट्रात तरी असा काही बंद पुकारल्या गेला आहे, हेच मुळी त्या दिवशी टीव्हीवर झळकलेल्या बातम्यांमधून समजले. महाराष्ट्रात कुठेही या बंदचा फारसा प्रभाव जाणवला नाही. उत्तर भारतातल्या काही राज्यांत मात्र बराच हिंसाचार झाला. जवळपास 14 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. कोट्यवधीच्या संपत्तीची हानी झाली. आंदोलनाचे स्वरूप जर भारतबंद असे होते तर...
Image
प्रहार रविवार, दि.1 एप्रिल 2018 भाजप दिग्दर्शित नाट्याचा अपेक्षित शेवट...! मोदी सरकारने अण्णांचा वापर `सेफ्टी व्हॉल्व्ह'सारखा करून घेतला. सरकार विरोधी आंदोलनाचे श्रेय इतरांना मिळू नये, त्याचा राजकीय फायदा विरोधी पक्षांना मिळू नये, हाच यामागचा उद्देश होता. नाशिकचा `लाँगमार्च' असो, किंवा अण्णांचे हे आंदोलन असो, भाजप आणि मोदी सरकारने त्यांचा वापर करून घेतला. हरपाल सिंग यांच्या नेतृत्वात भारतीय किसान युनियन आणि काही शेतकरी संघटनांनी 28 तारखेला या आंदोलनात सामील व्हायला सुरुवात केली होती, आणि गर्दी वाढू लागली होती. याची भनक लागल्यामुळे मग भाजपातर्फेच या नाटकावर अगदी अपेक्षितपणे पडदा पाडल्या गेला... नाशिकहून तीनशे किलोमीटर्सची पायपीट करीत मुंबईत दाखल झालेल्या शेतकऱ्यांच्या लाँग मार्चचा जसा अनपेक्षित आणि सरकारला अनुकूल शेवट झाला त्याच धर्तीवर अण्णा हजारेंच्या दिल्लीतील आंदोलनाचाही झाला. सरकारने म्हणे अण्णांच्या सगळ्या(?) मागण्या मान्य केल्या, येत्या सहा महिन्यांत त्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर अण्णा पुन्हा उपोषणाला बसणार, असेही सांगण्यात आले. सरकारने या मागण्या मान्य...
Image
प्रहार रविवार, दि.25 मार्च 2018 सत्ताधाऱ्यांचे सगळ्यांनाच गुंडाळण्याचे धोरण! या मोर्चात सामील झालेल्या बहुतेक शेतकऱ्यांची मागणी वनजमिनीच्या पट्ट्यांसंबंधी होती आणि ती मान्य करण्यात सरकारला काहीही अडचण नव्हती, कारण तसा कायदा आधीच पारित झाला आहे. आता प्रत्यक्षात हे पट्टे या आदिवासी शेतकऱ्यांना कधी मिळतात, हे त्या सरकारलाच माहीत. आश्वासन देऊन शेतकऱ्यांची बोळवणूक करण्यात आली. राशन कार्डाच्या संदर्भात या शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते, तेदेखील सरकारने आश्वासन देऊन टोलवले. या शेतकऱ्यांच्या शंभर टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारने केला, विशेष म्हणजे या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनीही त्यावर समाधान व्यक्त केले. म्हणूनच ही मिलीजुलीभगत तर नव्हती, अशी शंका येत आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा 'लाँग मार्च' चांगलाच गाजला. माध्यमांमध्ये त्यावर बरीच चर्चा झाली. जवळपास तिनशे किलोमीटर्सचे अंतर पायी कापून हे शेतकरी मुंबईत धडकले. या `लाँग मार्च'मध्ये तीस ते चाळीस हजार शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे बोलले जात होते. अतिशय शिस्तबद्धपणे कुणालाही त्रास ...
Image
प्रहार रविवार, दि.18 मार्च 2018 काळासोबत चालावेच लागेल! पंढरीची वारी करता, तशीच ज्ञानाचीही वारी करा, जिथे मोजक्या नैसर्गिक साधनसंपत्तीतही आधुनिक प्रयोग करून शेतकऱ्यांनी आपले उत्पादन आणि उत्पन्न चांगल्याप्रकारे वाढविले आहे, तिथेही भेट द्या. पंढरीची वारी जगायचे कशासाठी हे सांगत असेल, तर ही ज्ञानवारी जगायचे कसे हे सांगून जाईल. ज्ञान आता केवळ कीर्तन, प्रवचनातूनच मिळत नाही, अनेक आधुनिक साधने आता तुमच्या हाताशी आहेत. लिहिता-वाचता येणाऱ्यांचे प्रमाण आता खूप वाढले आहे, त्यामुळे उत्तम पुस्तके, संगणक, मोबाईल या सगळ्यांच्या माध्यमातून आधुनिक ज्ञान प्राप्त करा. तुमचे आध्यात्मिक आयुष्य जितके महत्त्वाचे तितकेच किंवा त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे तुमचे भौतिक आयुष्य आहे. `कर्म ज्ञान सप्ताहाचे आयोजन करा! या माझ्या 25 फेब्रुवारीला प्रकाशित `प्रहार'वर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यापैकी बहुतांश सकारात्मक होत्या, योग्य विचार परखडपणे मांडल्याचे अनेकांनी कळविले; परंतु काही लोकांनी मात्र त्या लेखाचा उद्देश आणि आशय समजून न घेता केवळ संधी मिळाली म्हणून टीका करण्याचा उद्योग केला. बहिष्कार वगैर...
Image
प्रहार रविवार, दि.11 मार्च 2018 मोदी सरकारची चांगली सुरूवात...! भौतिक विकासाची गती वाढविणे आपल्या हाती आहे आणि त्यात सरकारची भूमिका खूप महत्त्वाची असते. शेवटी देशातील साठ टक्के वर्ग विकासापासून वंचित राहत असेल तर देश प्रगत होऊच शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासाची काळजी सरकारला प्राधान्याने घ्यावीच लागेल. तरच देश प्रगतिपथावर जाईल अन्यथा शेतकरी आत्महत्या करतच राहतील. आज मोदी सरकारने सध्या तरी घोषणांच्या माध्यमातून का होईना, तशी तयारी दर्शविली आहे. उद्या त्यांचे सरकार पुन्हा आले अथवा इतर कोणत्या पक्षाचे सरकार आले तरी ही प्रक्रिया थांबणार नाही, याची दक्षता घेतली जावी, हीच अपेक्षा आहे! विकास हा सृष्टीचा स्थायीभाव आहे. अगदी सुरुवातीला एका अणुरूपात बंदिस्त असलेल्या सृष्टीचा महास्फोटानंतर निरंतर विकास होत गेला, आकाशगंगा, सूर्यमाला निर्माण झाल्या, त्यानंतर पृथ्वी आणि कदाचित पृथ्वीसारख्या इतर ग्रहांवर जीवसृष्टी विकसित झाली, त्यातही आधी पाण्यात जीवसृष्टी जन्माला आली नंतर जमिनीवरचे जीव निर्माण झाले, हा सगळा विकासक्रम विज्ञान आपल्याला सांगतच असतो. अगदी आजचा मानवदे...
Image
प्रहार रविवार, दि.4 मार्च 2018 संघर्षाला पर्याय नाही!     आपण आपल्या शेतीला काळी आई म्हणतो, तिची सेवा केल्याने येणारी समृद्धी चिरकाल टिकणारी ठरेल, तिला ओरबाडून शेवटी हाती काहीच लागणार नाही. आपली आई आपल्या लेकरांना कधीच उपाशी ठेवत नाही, तसेच शेतीचेही आहे, शेती आपल्याला कधीच मरू देणार नाही; परंतु कष्ट, संघर्ष, जिद्द आणि हे सगळे योग्य दिशेने जाणे गरजेचे आहे. त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. शेतकऱ्यांच्या समस्या अनेक आहेत. त्यातील काही खरोखरच अगदी जीवघेण्या स्वरूपाच्या आहेत; परंतु समस्या आहेत म्हणून हातपाय गाळून बसता येणार नाही. खरे तर समस्या कठीण नसत्या तर त्या समस्याच नसत्या, म्हणजे त्या कठीण आहेत म्हणूनच समस्या आहेत आणि एक गोष्ट माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावी की प्रत्येक समस्येवर उत्तर असतेच, कधी ते थोड्या प्रयत्नाने मिळते तर कधी त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात; परंतु प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपली मनोवृत्ती बदलायला हवी. सगळ्यात आधी आपल्या समोरचे प्रश्न आपणच सोडवायचे आहेत, ही खूणगाठ त्याने मनाशी बांधावी. कुणी तरी मदतीला येईल,...
Image
प्रहार रविवार, दि.25 फेब्रुवारी 2018 `कर्म-ज्ञान; सप्ताहाचे आयोजन करा...! चांगले विचार, चांगल्या कल्पना केवळ डोक्यात भरून चालत नाही, त्यावर अंमल होणे गरजेचे आहे. आज आपला शेतकरी मागे आहे, आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीत जीवन जगत आहे कारण आधुनिक जगाशी, आधुनिक विचारांशी त्याने जुळवून घेतलेले नाही. आजही रिकामा वेळ तो पुस्तक वाचण्याऐवजी टाळ कुटण्यात, पायदळ वारी करण्यात किंवा देव-देव करण्यात घालवतो. तुकाराम महाराज आज असते तर त्यांनी पुन्हा एकदा; बुडती हे जन पाहावेना डोळा, म्हणून कळवळा येतसे; असेच म्हटले असते. माझ्या मागच्या ;प्रहारवर असंख्य लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे, ईमेलद्वारे तुम्ही खूप सुंदर विवेचन केल्याचे सांगितले. त्या सगळ्यांचे आभारच आहे; परंतु मला या कौतुकापेक्षा कृतिशीलता अधिक अपेक्षित आहे. एखादा विचार ऐकल्यावर, एखादे पुस्तक वाचल्यावर खूप सुंदर अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आपल्या तोंडून बाहेर पडते, ते त्या विचाराचे, पुस्तकाचे यश असले तरी ते खूप मर्यादित यश ठरते. अशा पुस्तकापासून, अशा विचारांपासून प्रेरणा घेऊन...
Image
प्रहार रविवार, दि.18 फेब्रुवारी   2018   शेतकऱ्यांनी कर्मयोगी बनावे!   शेतकऱ्यांनी आता बुद्धिवादी, कर्मवादी बनावे. राजकारण आणि राजकारण्यांपासून चार हात लांबच राहावे, आपली शेती, आपला उद्योग, आपला धंदा आणि यातून चार पैसे कसे वाचतील याची हिकमत अवगत करावी, आणि तोच माल उत्पादित करावा ज्याची बाजारात मागणी आहे. त्यावर थोडी प्रक्रिया आणि पॅकिंग करून त्यापासून जास्त पैसे कसे मिळतील याचा प्रयत्न करावा. सप्ताह, पारायणे, कथा, किर्तने हे निव्वळ वेळ वाया घालविण्याचे उद्योग आहेत. त्या बुवा-बाबांच्या कमाईचा तो भाग आहे, त्यांचे खिसे आणि पोट भरण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपला वेळ आणि पैसा सार्थकी लावा. शेवटी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भवितव्य तुमच्या कष्टावरच अवलंबून आहे, कोणताही देव आणि कोणतेही सरकार तुमच्या मदतीला धावून येणार नाही. महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी मानली जाते. या सगळ्या संतमंडळींनी समाजाच्या प्रबोधनाचे काम केले आहे. भिक्तयोगासोबतच कर्मयोगाचाही त्यांनी तितक्याच हिरिरीने प्रचार आणि प्रसार केला. 'आधी प्रपंच करावा नेटका' असा संदेश देण...