प्रहार
रविवार, दि.25 ऑगस्ट 2013 साळगावकर आणि दाभोलकर - दोन टोके! विज्ञानाची कास धरणारे पाश्चात्य देश आज प्रगतीच्या वाटेवर कुठल्या कुठे निघून गेले आहेत आणि आपण मात्र अजूनही धार्मिक जळमटांना आपली आभुषणे समजत अनेक खुळचट, वेडगळ कल्पनांना चिकटून आपल्याच विकासाची वाट रोखून उभे आहोत. दाभोलकरांसारखी एखादी व्यक्ती आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालू पाहते आणि आम्हाला ते सहन न होऊन आम्ही त्यांनाच संपवायला निघतो. अर्थात दाभोलकरांची हत्या करून धार्मिक उन्माद साजऱ्या करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे, की शेवटी विजय सत्याचाच होत असतो आणि सत्य हे नेहमी तर्कशुद्ध, वैज्ञानिक विचारांच्या बाजूनेच उभे असते. आपल्या पुरोगामीत्वाचा डंका मिरविणाऱ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली जावी अशी घटना या आठवड्यात घडली. या महाराष्ट्राने पुरोगामी, आधुनिक आणि वैज्ञानिक विचार देशाला दिले. अनेक संत, महात्मे आणि सामाजिक तसेच राजकीय धुरिणांनी या पुरोगामी विचारांची पताका समर्थपणे आपल्या खांद्यावरून वाहून नेली. आधुनिक विचारांच्या या वारकऱ्यांमधील एक अतिशय आदराचे व्यिक्तमत्त्व असलेल्या डॉ. नरेंद्र