Posts

Showing posts from May, 2017

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017

Image
प्रहार रविवार , दि . 28 मे   2017 शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ... ही हिंमत दाखवा !   फडणवीस सरकार शेतकऱ्यांना न्याय देत नाही आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासमोर बाकी सगळ्या गोष्टी तुच्छ आहेत , यावर सगळ्या सरकार विरोधकांचे ज्यात शिवसेनेचाही समावेश आहे , एकमत असेल तर या सगळ्यांनी मिळून हे सरकार घालवायला पाहिजे आणि केवळ शेतकऱ्यांसाठी संयुक्त सरकार स्थापन   करायला पाहिजे ....   सध्या सगळ्याच राजकीय पक्षांना शेतकऱ्यांचा खूपच कळवळा आल्याचे दिसत आहे . एरवी परस्पर विरुद्ध दिशेला तोंडे असलेले विरोधी पक्षातील नेते शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी एकत्र येऊन संघर्ष यात्रा काढत आहेत . विरोधी पक्षांचा हा संघर्ष तसा स्वाभाविक म्हणता येईल , परंतु सत्ताधारी आघाडीत असलेले पक्षदेखील आपल्याच सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरताना दिसत आहे . शेतकऱ्यांच्या मागणीला इतका अभूतपूर्व पाठिंबा यापूर्वी कधी मिळाला नव्हता , परंतु अडचण ही आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर