प्रहार, रविवार, दि. 8 मार्च 2015 अस्सल गोवंश आहे तरी कुठे?
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com रविवार, दि. 8 मार्च 2015 अस्सल गोवंश आहे तरी कुठे ? भारत स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे 1960-70 च्या दशकात जेव्हा पहिल्यांदागोहत्या बंदी कायद्याची मागणी करण्यात आली होती तेव्हाच तो कायदा केल्या गेला असता,तर देशी गाई बचावल्या असत्या आणि त्यांचा शेतकऱ्यांना बराच आर्थिक आधारमिळाला असता, परंतु भारतीय गोवंश संपवून टाकण्यात आला आणि इकडच्यावातावरणाशी जुळवून न घेता येणाऱ्या संकरीत गाइंर्ची पैदास वाढविण्यात आली. परिणामीशेतकऱ्यांकडचे अस्सलगोधन आपोआप संपुष्टात येत गेले. सरकारला गोहत्या होऊ नये असे खरोखर वाटत असेल, तर सरकारनेब्राझीलमधून उत्तम दर्जाच्या आणि भारतीय वंश असलेल्याच गाइंर्ची आयात करावी,त्या शेतकऱ्यांना वाटाव्या, अन्यथा गोवंश हत्याबंदीमुळेविकल्याही जात नाहीत म्हणून शेतकऱ्यांनी मोकाट सोडलेल्या गाई पोसण्यासाठी सरकारला ठिकठिकाणी पांजरपोळ उभेकरावे लागतील. महाराष्ट्र सरकारने पारित केलेल्या गोवंश हत्या बंदी विधेयकावर नुकतीच राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आणि गेली 19 वर्षे रेंगाळत असलेला ह