Posts

Showing posts from 2020

धडा ; पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीपासून...*

Image
*‘प्रहार’* रविवार, दि. २७ डिसेंबर २०२० *धडा ; पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीपासून...* (लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश आणि संस्थापक अध्यक्ष - ‘किसान ब्रिगेड’) _आज दिल्लीत शेतकरी सीमेवर त्याला अडचणीत आणणारे ३ कायदे रद्द करण्यात यावे याकरिता मागील महिन्यापासून गोठवणाऱ्या थंडीत कुडकुडत बसला आहे; मात्र सरकार भीक घालायला तयार नाही, कारण देश कार्पोरेट कंपन्यानी ताब्यात घेतला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मुक्तीचा एकमेव मार्ग म्हणजे कमी खर्चाची विषमुक्त ‘सेंद्रीय शेती’ची चळवळ व ‘गाव तेथे किसान ब्रिगेड’चा बोर्ड लावणे, तेव्हा उठा आणि कामाला लागा._           पूर्वी शेतकरी शेतमाल घरी ठेवून असायचा आणि व्यापारी किंवा अडते गावोगाव फिरून शेतकऱ्यांच्या घरी जाऊन शेतमाल जमा करायचे. त्या वेळेला मागणी-पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार पुरवठा कमी आणि मागणी जास्त होती आणि शेतकरी बियाणे, खते, मनुष्यबळ या बाबतीत स्वयंपूर्ण होता, म्हणजेच शेतकरी ‘दाता’ होता आणि शहरात राहणारे ‘याचक’ होते.           *हरित क्रांती झाली आणि परिणामी मागणीपेक्षा पुरवठा वाढला. त्यानुसार

सरकारच्या पिळवणुकीचा बळी शेतकरी...!

Image
  'प्रहार' रविवार, दि. २० डिसेंबर २०२० सरकारच्या पिळवणुकीचा बळी शेतकरी...! (लेखक : प्रकाश पोहरे, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) शेतीची झालेली दुरावस्था आणि सातत्याने शेतकऱ्यांवर होणारा अन्याय हे सर्व पाहता आता या मुद्द्यांवर म्हणजे शेतकऱ्यांच्या संख्येनुसार शेतकरी प्रतिनिधी हे विधानसभा व विधान परिषदेत तसेच लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये हे असणे आणि त्या अनुषंगाने लढा उभारणे हाच शेतकरी समस्यांवरचा अंतिम उपाय ठरणार आहे. ज्याप्रमाणे केवळ तीन टक्के असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या संघटनेच्या, एकजुटीच्या बळावर स्वतःकरिता वेतन आयोग लागू करून घेतला त्याच प्रमाणे शेतकऱ्यांनी या या मुद्यावर एकत्रित येऊन आपल्या हक्काचे प्रतिनिधी निवडणे आज कायमस्वरूपी तोडगा राहणार आहे; अन्यथा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७० वर्षे झाल्यानंतरही शेतकऱ्यांचे जे हाल झाले आहेत ते येणाऱ्या दिवसात सुद्धा सुरू राहतील.          राजधानी दिल्लीतील शेतकर्‍यांचे आंदोलन आता निर्णायक वळणावर पोहचल्याचे दिसत आहे. सरकारच्या कोणत्याही चक्रव्युहात न अडकण्याची खबरदारी शेतकरी घेत आहेत. आंदोलनाला राजकीय वळण लागू न

*पंजाबच्या शेतकर्‍यांचा वज्रनिर्धार**आणि हतबल मोदी सरकार...!*

Image
    *'प्रहार'* रविवार, दि. १३ डिसेंबर २०२० *पंजाबच्या शेतकर्‍यांचा वज्रनिर्धार* *आणि हतबल मोदी सरकार...!* (लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) _कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व संपवून शेती क्षेत्र कार्पोरेट क्षेत्राच्या हवाली करण्याची ही खेळी आहे. शिवाय शेतकर्‍यांना असलेले हमीभावाचे संरक्षणही काढण्याचा डाव त्यामागे आहे. वास्तविक शेती हे क्षेत्र सामायिक सूचीत समाविष्ट आहे, म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार शेती क्षेत्रासाठी नियम, कायदे करू शकतात, परंतु या नव्या कायद्याने राज्य सरकारच्या हातून शेती क्षेत्र निसटणार आहे आणि त्यावर केंद्राचे पूर्ण नियंत्रण येणार आहे. कार्पोरेट क्षेत्राला विना अडथळा शेती क्षेत्रात धुडगूस घालता यावा, यासाठीच हे केले जात आहे. या शेतकरी आंदोलनामुळे पंजाब व महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांमधील तफावत प्रकर्षाने दिसून येत आहे. पंजाबकडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र आज जर काही शिकला नाही तर येणार्‍या काळात महाराष्ट्राचे निश्चितपणे फार मोठे नुकसान होणार आहे हे शेतकऱ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे आणि गावागावात किसान ब्रिगेड

गुजरातच्या विकासाकरिता महाराष्ट्राचा बळी!*

Image
*'प्रहार'* रविवार, दि. ६ डिसेंबर २०२० *गुजरातच्या विकासाकरिता महाराष्ट्राचा बळी!* (लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) _दिल्लीश्वरांना मराठी माणूस, मराठी मुलूख सतत खूपत असतो ही ऐतिहासिक परंपरा आजही कायम आहे. गुजरातचा किंवा अन्य कोणत्याही राज्याचा विकास होत असेल तर त्यात आक्षेप असण्याचे कारण नाही, परंतु महाराष्ट्राची मुंडी पिरगाळून या विकासाचे इमले उभे होत असतील तर ती बाब निषेधार्हच म्हणायला हवी._              दिल्लीच्या सिंहासनावर बसून संपूर्ण देशावर सत्ता गाजविण्याच्या औरंगजेबाच्या स्वप्नांना पहिले कडवे आव्हान दिले ते या महाराष्ट्राने, या मराठी मातीने. या मातीचा अंगभूत गुण असलेल्या शौर्याला आकार आणि दिशा देत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची पताका उभारली. मोगलशाही, आदिलशाही, निजामशाहीला एकाचवेळी टक्कर देत शिवाजी महाराजांनी आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले. अख्खा देश आपल्या टाचेखाली आणणार्‍या मोगली सल्तनतला हे छोटेसे स्वराज्य शेवटपर्यंत संपविता आले नाही. *दिल्लीश्वरांना कुणी आव्हान दिलेले तेव्हाही आवडत नव्हते, आजही आवडत

कोरोनाचा बाजार आणि धास्ती...!

Image
*'प्रहार'* रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२० *कोरोनाचा बाजार आणि धास्ती...!* (लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) _या देशात खरे प्रश्न कधीच चर्चेला येऊ दिले जात नाही. या खर्‍या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून असे काही फंडे काढले जातात. कोरोना संकटकाळात मोदी सरकारने किती विधेयके पारित करून घेतली आणि त्याचा परिणाम पुढे काय होणार, याची सामान्य लोकांना काहीही कल्पना नाही. अगदी परवाच दिल्लीत शेतकर्‍यांचा प्रचंड मोठा मोर्चा निघाला, तो अडविण्यात आला, शेतकर्‍यांवर 'वॉटर कॅनन'ने पाण्याचा मारा करण्यात आला, शत्रू सैन्याला रोखण्यासाठी केली जाते तशी व्यूहरचना केली गेली, अडथळे उभारले गेले, परंतु माध्यमांनी या दडपशाहीची दखल घेतली नाही, कुठे चर्चा नाही. चर्चा होते ती कोरोनाची. सरकारची दहशत, सरकारची दडपशाही झाकून टाकण्यासाठी या कोरोनाची दहशत निर्माण केल्या गेली, असेच चित्र समोर येत आहे._     सध्या भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला *कोरोना नामक नव्या आतंकवादाने* अगदी झपाटून टाकले आहे. हा कोरोना कशामुळे होतो, माहीत नाही. म्हणजे कोरोनाबाधित

*'निवडणुक यंत्रणा की मंत्रणा'?*

Image
*'प्रहार'* रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२० *'निवडणुक यंत्रणा की मंत्रणा'?* (लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) _मतदान यंत्रामुळे आता निकाल झटपट मिळतात, व्यवस्थेवरचा ताण कमी होतो, निवडणूक प्रक्रिया अधिक सुटसुटीतपणे पार पडते, बोगस मतदान होत नाही किंवा त्याचे प्रमाण अतिशय नगण्य असते, बुथ कॅप्चरिंग हा प्रकार आता जवळपास हद्दपार झाला, असे अनेक चांगले बदल निवडणूक आयोग दाखवू शकते किंवा सांगण्यासारखे असे अनेक मुद्दे निवडणूक आयोगाकडे आहेत, परंतु ही मतदान यंत्रे आणि नंतरची मतमोजणी निर्दोष असते का, यावर मात्र अनेकदा प्रश्नचिन्ह लावले जातात. या मतदान यंत्रात हेराफेरी करता येते, असा अनेकांचा दावा आहे. निवडणूक आयोगाने (?) हे सगळे आक्षेप मागेच फेटाळून लावले आणि यापुढे निवडणुकांसाठी मतदान यंत्रेच वापरली जातील, असे ठामपणे सांगितले. याचा अर्थ निवडणूक आयोगाचे हे मत बदलत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया यंत्राद्वारेच पार पडणार आहे आणि ही यंत्रे कशी करामत दाखवतात, हे वारंवार दिसून आले आहे._       भारतात मतदान यंत्राच्या माध्यमातून घेण्यास सुरूवात

Golden Days In My Life..

दोस्तांनो ,,,  मागील 8 - 9 महिन्यात दोस्तांचा एक मस्त ग्रुप तयार झालाय ,,, सकाळी साडेचार वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठणे, पाचला जॉगिंग, साडेपाच ते सात वाजेपर्यंत सूर्यनमस्कार ,योगासने आणि नंतर प्राणायाम ,,, तर कधी स्विमिंग ,,, नंतर गरमागरम काढा ,,,, संपूर्ण दोन अडीच तास तास कसे जातात कळतच नाहीत ,,, आणि सध्या मस्त गुलाबी थंडी सुरू आहे ,,,,  नंतर नाष्टा झाला की 9 ते 1 वाजेपर्यंत माझ्या शेतातील पेरूच्या बागेतील विविध कामे किंवा कधी काकडी तर कधी पिकलेले पेरू तोडतांना जॉब satisfaction चा जो आनंद मिळतो त्याची काही तुलनाच होऊ शकत नाही एका किलो मध्ये दोन किंवा तीनच पेरू बसतात ,,, आणि पेरू व काकडीची चव तर अशी की तुम्ही खातच राहाल कारण 100% ऑरगॅनिक ,,, पेरू तोडता तोडता झाडाची कटिंग सुरू असते ,,, तसेच पेरू तोडतांना इयर फोन लावून महत्त्वाच्या विषयावर फोन सुद्धा चालू असतात ,,,, उन्हात काम करत असल्यामुळे विटामिन डी सुद्धा मिळते ,,,, म्हणजे 4 इन वन ,,,,  सकाळ कधी होते आणि रात्र कधी येते कळतच नाही आणि झोप ,,, अरे बेडवर पडल्यावर डोळे कधी बंद होतात कळतच नाही।  सगळे जग कोरोनाच्या भीतीने लॉक डाऊन मधे गलीत गात

कोरोनाच्या भयातून बाहेर पडा आपली बिघडलेली दिनचर्या पूर्वपदावर आणा ....

Image
*दीपावली* निमित्त आपणा सर्वांना *लक्ष लक्ष शुभेच्छा!*   * *हि दीपावली आपल्या जीवनात आनंद व सुखासमाधानाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना!*  * *निरोगी राहण्यासाठी विषमुक्त , भेसळमुक्त शेतमालाचा आग्रह धरा* ,,,,,,*  *हॉस्पिटलची लाखो रुपयांची बिले भरल्यापेक्षा शेतकऱ्यांना थोडे अधिकचे पैसे देणे चांगले* *  *लवकर झोपा, लवकर उठा , योगासने व प्राणायाम करा, निरोगी रहा* *शुभेच्छुक:* *प्रकाश पोहरे* *किसान ब्रिगेड* 9822593921 2prakashpohare@gmail.com

जे दिल्लीत शक्य झाले ते मुंबईत का नाही !!

 ' प्रहार ' रविवार, दि. ८ नोव्हेंबर २०२० जे दिल्लीत शक्य झाले ते मुंबईत का नाही !! (लेखक : प्रकाश पोहरे , मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) मर्यादित उत्पन्न स्त्रोत असूनही दिल्लीत आम आदमीचे जगणे सुसह्य, सुखकारक होऊ शकते आणि प्रचंड उत्पन्न असूनही मुंबईकर जनतेला मात्र हाल सोसावे लागत असतील तर हे अंतर राज्यकर्त्यांमध्ये असलेल्या दुरदृष्टीच्या, इच्छाशक्तीच्या अभावाने पडत आहे. हा अभाव तेव्हाच निर्माण होतो जेव्हा राजकारण स्वार्थप्रेरित असते. राजकारण समाजहितासाठी होत असेल तर त्याचे स्वरूप कसे असू शकते, हे पाहायचे असेल तर तुम्ही दिल्लीत जा आणि राजकारण पैशाच्या दलदलीत फसले असेल तर सामान्य लोकांची कशी परवड होते हे पाहायचे असेल तर मुंबईत जा, असेच म्हणावे लागेल.   राजकारणाची नाळ सर्वसामान्यांच्या हिताशी जुळलेली नसणे ही एक खूप मोठी समस्या आहे आणि ती अगदी जागतिक आहे. जगभरातील काही मोजके अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत देश सोडले तर बहुतेक देशांमध्ये राजकारण स्वार्थी वृत्तीने प्रेरित असल्याचे दिसते. देशाची सत्ता या राजकीय लोकांच्या हाती असते, कधी हा तर कधी तो पक्ष सत्तेत असतो,