प्रहार, रविवार , दि. 29 डिसेंबर 2013-' घटना आणि त्यामागील राजकारण '
रविवार, दि. 29डिसेंबर 2013 'घटनाआणि त्यामागील राजकारण' भ्रष्टाचार ही समस्या आज आपल्याला खूप मोठी वाटत आहे , भ्रष्टाचाराची चीड येऊन लोक सरकार उलथून टाकत आहेत , परंतु या समस्येवरचे अतिशय सोपे समाधान लोकांना का कळत नाही , सरकारला तसे निर्णय घेण्यास लोक का बाध्य करत नाही , हाच मुळी लाखमोलाचा प्रश्न आहे. जनलोकपालसाठी मोठे आंदोलन उभे राहते , तो मुद्दा प्रचाराचा मुख्य भाग बनवून एखादा पक्ष सत्ता उलथवून टाकतो , परंतु या सगळ्यांच्या मुळावर घाव घालणाऱ्या उपायांसाठी मात्र कुणीही रस्त्यावर यायला तयार नाही , हे या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. लेख तुमच्यासमोर असेल तोपर्यंत दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तारूढ झालेले असेल. अरविंद केजरीवालांनी दिल्लीत कमाल करून दाखवली, यात वाद असण्याचे कारण नाही. अवघ्या एक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या पक्षाने पहिल्याच प्रयत्नात सत्ता स्थापन करण्याइतपत मजल गाठावी, हे नक्कीच कौतुकास्पद म्हणा