प्रहार, रविवार, दि. 13 जुलै 2014 “ शेतकर्यांसाठी अच्छे दिन येतील का “?
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com रविवार, दि. 13 जुलै 2014 “ शेतकर्यांसाठी अच्छे दिन येतील का “ ? सामान्य जनतेच्या प्रचंड अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारची आर्थिक नीती कशी असेल, यापुढच्या काळात देश कोणत्या दिशेने वाटचाल करेल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे `अच्छे दिन'चे स्वप्न दाखविणाऱ्या मोदींच्या राजवटीत कायमच `बुरे दिन'चा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था सुधारेल की नाही, या प्रश्नांची थेट उत्तरे अर्थमंत्री अरूण जेटलींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून मिळत नसली, तरी जे संकेत त्यांनी दिले आहे ते पाहता कालच्यापेक्षा आजचा दिवस बरा आहे आणि उद्याचा अधिक चांगला असेल, असे शेतकरी म्हणू शकतात. निवडणूक प्रचाराच्या काळात नरेंद्र मोदींनी देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना मनमोहन सरकारचे कृषी धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला होता. कदाचित शेतकऱ्यांना त्या आरोपात तथ्य वाटले असावे आणि म्हणूनच मोदींच्या हाती सत्ता सोपविण्याचा निर्णय देशभरातील शेतकऱ्यांनी बहुसंख्येने घेतला. त्या पृष्ठभूमीवर शेतकऱ्यांच्य