कोरोनाचा बाजार आणि धास्ती...!
*'प्रहार'* रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२० *कोरोनाचा बाजार आणि धास्ती...!* (लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) _या देशात खरे प्रश्न कधीच चर्चेला येऊ दिले जात नाही. या खर्या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून असे काही फंडे काढले जातात. कोरोना संकटकाळात मोदी सरकारने किती विधेयके पारित करून घेतली आणि त्याचा परिणाम पुढे काय होणार, याची सामान्य लोकांना काहीही कल्पना नाही. अगदी परवाच दिल्लीत शेतकर्यांचा प्रचंड मोठा मोर्चा निघाला, तो अडविण्यात आला, शेतकर्यांवर 'वॉटर कॅनन'ने पाण्याचा मारा करण्यात आला, शत्रू सैन्याला रोखण्यासाठी केली जाते तशी व्यूहरचना केली गेली, अडथळे उभारले गेले, परंतु माध्यमांनी या दडपशाहीची दखल घेतली नाही, कुठे चर्चा नाही. चर्चा होते ती कोरोनाची. सरकारची दहशत, सरकारची दडपशाही झाकून टाकण्यासाठी या कोरोनाची दहशत निर्माण केल्या गेली, असेच चित्र समोर येत आहे._ सध्या भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला *कोरोना नामक नव्या आतंकवादाने* अगदी झपाटून टाकले आहे. हा कोरोना कशामुळे होतो, माहीत नाही. म्हणजे कोरोनाबाधित