प्रहार, रविवार, दि. 25 जानेवारी 2015 सवलती गरजवंतांनाच मिळायला हव्या!
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com रविवार, दि. 25 जानेवारी 2015 सवलती गरजवंतांनाच मिळायला हव्या! जे लोक सवलती न घेण्याइतके आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी सवलती घ्याव्यात का आणि सरकारनेही त्यांना त्या द्याव्यात का , हा कळीचा प्रश्न आहे. विशेषत: सरकारी तिजोरीची अवस्था फारशी चांगली नसताना सवलतींवर , सबसिडींवर अशी उधळपट्टी करणे सरकारला कसे परवडू शकते. खरे तर ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्या लोकांनी स्वत:हून पुढाकार घेत या सवलती नाकारायला हव्या. लोकांना स्वत:हूनच हे कळायला हवे आणि त्यांना तसे कळत नसेल तर सरकारने आपल्या धोरणात , कायद्यात बदल करून मदत , सवलत खऱ्या गरजवंतांनाच मिळेल अशी तरतूद करायला हवी. राज्यात सध्या दुष्काळाचे वातावरण आहे, अवेळी पाऊस, गारपीट यांमुळे शेतकऱ्यांच्या हाती येऊ पाहणारे पीक हातचे गेले आहे. नोकरदारांचे पगार एवढे वाढले आहेत, की राज्याची