धडा ; पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीपासून...*
*‘प्रहार’* रविवार, दि. २७ डिसेंबर २०२० *धडा ; पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीपासून...* (लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश आणि संस्थापक अध्यक्ष - ‘किसान ब्रिगेड’) _आज दिल्लीत शेतकरी सीमेवर त्याला अडचणीत आणणारे ३ कायदे रद्द करण्यात यावे याकरिता मागील महिन्यापासून गोठवणाऱ्या थंडीत कुडकुडत बसला आहे; मात्र सरकार भीक घालायला तयार नाही, कारण देश कार्पोरेट कंपन्यानी ताब्यात घेतला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मुक्तीचा एकमेव मार्ग म्हणजे कमी खर्चाची विषमुक्त ‘सेंद्रीय शेती’ची चळवळ व ‘गाव तेथे किसान ब्रिगेड’चा बोर्ड लावणे, तेव्हा उठा आणि कामाला लागा._ पूर्वी शेतकरी शेतमाल घरी ठेवून असायचा आणि व्यापारी किंवा अडते गावोगाव फिरून शेतकऱ्यांच्या घरी जाऊन शेतमाल जमा करायचे. त्या वेळेला मागणी-पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार पुरवठा कमी आणि मागणी जास्त होती आणि शेतकरी बियाणे, खते, मनुष्यबळ या बाबतीत स्वयंपूर्ण होता, म्हणजेच शेतकरी ‘दाता’ होता आणि शहरात राहणारे ‘याचक’ होते. *हरित क्रांती झाली आणि परिणामी मागणीपेक्षा पुरवठा वाढला. त्यानुसार