Posts

Showing posts from 2015

प्रहार, रविवार, दि. 2 ऑगस्ट 2015 शेतकऱ्यांचे सारेच शत्रू!

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com       रविवार , दि. 2 ऑगस्ट 2015 शेतकऱ्यांचे सारेच शत्रू! शेतकरी संघटित झाले , तर सरकारला त्यांच्या पायाशी लोळण घेणे भाग पडेल , परंतु तसे होऊ नये याची सरकार पुरेपूर काळजी घेत असते आणि म्हणूनच शेतकऱ्यांना विभाजित करून त्यांच्यातच संघर्ष निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असतो.   हे कमी की काय म्हणून खते , बियाणे वगैरेंचा पुरवठा करणारे व्यापारीही त्याला लुटण्यासाठी सज्ज असतात. त्यामुळे शेवटी प्रश्न उरतो तो शेतकऱ्यांच्या हिताची काळजी करणारा आहे कोण ? प्रश्नाचे उत्तर कुणीच नाही , हेच आहे , सगळेच शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. दुर्दैव हेच आहे , की या देशात याकुबसाठी गळा काढणाऱ्या लोकांची रिघ लागते , परंतु शेतकऱ्यांच्या मरणावर साधे दोन अश्रू डोळ्यातून गाळणारा कुणीच नाही. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकुब मेमनला गुरुवारी फासावर लटकविण्यात आले. त्याला प्रथम टाडा कोर्टाने आणि नंतर सर्वोच्च