प्रहार,रविवार, दि. 15 फेब्रुवारी 2015 दिल्लीचा दणका भाजपसाठी इष्टापत्ती?
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com रविवार, दि. 15 फेब्रुवारी 2015 दिल्लीचा दणका भाजपसाठी इष्टापत्ती ? भाजपने दिल्लीचा `सेफ्टी व्हॉल्व्ह 'सारखा वापर केला. लोकांचा रोष दिल्लीच्या माध्यमातून कमी करण्यात भाजप यशस्वी झाला. अर्थात हा एक तर्क आहे , परंतु ज्या पद्धतीने , ज्या रणनीतीने भाजपने दिल्ली लढविली ते पाहता या तर्काला नक्कीच आधार मिळतो. पुढे मोठी झेप घेण्यापूर्वी थोडी माघार घेण्यासारखा हा प्रकार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत पराभव झाला. हा पराभव अनपेक्षित नव्हता; परंतु तो इतका दणदणीत असेल, असे वाटले नव्हते. आम आदमी पक्षाला चाळीसपर्यंत जागा मिळतील, असा सगळ्यांचाच अंदाज होता, कदाचित आम आदमी पक्षालाही तीच अपेक्षा होती; परंतु जो निकाल समोर आला तो सगळ्यांनाच हादरवून टाकणारा होता. वास्तविक दिल्लीत भाजपचे संघटन `आप'सह इतर कोणत्याही पक्षांपेक्षा अधिक चांगले आहे, शिवाय संघाचे नेटवर्कदेखील भाजपच्या दिमतीला असते. त्याच जोरावर आठ महि