Posts

Showing posts from September, 2016
Image
प्रहार रविवार , दि . 25  सप्टेंबर   2016 फडणविसांनी ` देवेंद्र ' व्हावे !    केंद्र आणि राज्य सरकारने हे लक्षात घ्यायला हवे की ही सगळी आंदोलने किंवा ही सगळी अस्वस्थता शेतीच्या बिघडलेल्या अर्थशास्त्रातून पुढे येत आहे . भारत हा कृषिप्रधान देश आहे किंवा तसे म्हटले जाते , परंतु कृषी क्षेत्राच्या विकासाकडे आतापर्यंतच्या सरकारांनी कधीही गांभीर्याने पाहिलेले नाही , ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे . ज्या व्यवसायावर किंवा क्षेत्रावर देशातील 70 टक्के लोक अवलंबून आहेत त्या क्षेत्राच्या विकासासाठी देशाच्या बजेटमधील तरतूद कधीही 4 टक्क्यांच्या वर गेलेली नाही . सरकारची शेती क्षेत्राबाबतची ही प्रचंड अनास्थाच लोकांच्या अस्वस्थतेचे मुख्य कारण आहे . किमान महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने तरी आता जागे व्हावे , लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या मूक मोर्चांचा आवाज समजून घ्यावा आणि शेतीसाठी स्वतंत्र बजेट मांडण्याचा निर्णय घेऊन एक नवीन पायंडा पाडावा .     मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने निघणारे शिस्