प्रहार रविवार, दि.23 ऑक्टोबर 2016
प्रहार रविवार, दि.23 ऑक्टोबर 2016 कर्मचारीच कामात अडथळा आणतात त्याचे काय? खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारणे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे जनतेच्या कामात अडथळा निर्माण करणे हा दंडनीय अपराध समजून तत्काळ त्या कर्मचाऱ्यांना घरी बसवायला पाहिजे, तसा कायदा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या अधिकाऱ्यांची ब्रिटिशकालीन मग्रुरी कमी होणार नाही. हे सगळे लोक जनतेचे सेवक आहेत, याची कायद्याने त्यांना जाणीव करून देणे गरजेचे आहे, कारण भारतात लोकशाही आहे आणि लोकशाहीत जनता सर्वोतोपरी असते. आपल्या देशात लोकशाही शासन व्यवस्था आहे आणि आपण ती अतिशय अभ्यासपूर्वक निवडलेली आहे. जगातल्या इतर अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशासाठी एक आदर्श शासन व्यवस्था तयार केली. लोकशाहीची जगन्मान्य व्याख्या करणाऱ्या अब्राहम लिंकनने ``लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही'' असे म्हटले होते, परंतु लिंकनच्या अमेरिकेतील लोकशाही आणि भारतातील लोकशाही यातही फरक आहे. भारतातील लोकशाही अमेरिकेच्या तुलनेत अधिक लोकाभिमुख आहे, असे म्हणता येऊ शकते. अमेरिकेत अध्यक्षीय प्रणाल