Posts

Showing posts from February, 2017

शेतकरी कोमात, मराठे मौनात आणि भाजपा जोमात! प्रहार रविवार, दि.26 फेब्रुवारी 2017

Image
प्रहार रविवार , दि .26  फेब्रुवारी   2017        शेतकरी कोमात , मराठे मौनात आणि भाजपा जोमात !               नगरपालिकांपाठोपाठ महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही राज्यातील जनतेने भाजपला कौल दिला . हा जनतेचा कौल आहे , त्यामुळे तो सन्मानपूर्वक स्वीकारायलाच हवा , परंतु त्याचे विश्लेषण , त्याची चिकित्सा केली जाऊ शकते आणि ती व्हायलादेखील हवी . भाजपचे नेते आज हेच सांगत आहेत की नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक , विकासाभिमुख राजकारणावर राज्यातील जनतेने आपल्या मान्यतेची मोहोर उमटविली . भाजपचा मोठा विजय झाल्यामुळे त्यांच्या नेत्यांचे सगळेच तर्क मान्य करावे लागतील किंवा किमान ऐकून तरी घ्यावेच लागतील , परंतु वस्तुस्थिती काय आहे , याचाही विचार व्हायला हवा . भारतातील मतदार सुज्ञ आहेत , असे म्हटले जाते . कोणत्याही भूलथापांना ते बळी पडत नाहीत आणि आपली ताकद मतपेटीच्या माध्यमातून ते वारंवार दाखवित असतात , असेही बोलले जाते . हे वरकरणी सत्य वाटत असले तरी हे काल - परवाचे निकाल