कुढत जगायचे की..? प्रहार रविवार, दि.30 जुलै 2017
प्रहार रविवार , दि .30 जुलै 2017 राजकीय नेते आंदोलनात घुसले की आंदोलनाचा कसा सत्यानाश होतो याचे अगदी ताजे उदाहरण नुकत्याच झालेल्या आणि सपशेल फसलेल्या शेतकरी आंदोलनातून दिसून येते . त्यामुळे यापुढे तरी शेतकऱ्यांनी राजकारण्यांना थारा देऊ नये . राजकीय नेते कोणत्याही पक्षाचे असले तरी शेवटी त्यांची जातकुळी एकच असते , हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे . यापुढे आंदोलन करायचे तर ते अगदी अहिंसक आणि राजकीय नेत्यांना बाजूला सारूनच , अशी खूणगाठ शेतकऱ्यांनी आपल्या मनाशी बांधायला हवी . सरकारला नमविणारे आणि शांततामय आंदोलन म्हणून आम्ही जेलभरोची कल्पना शेतकऱ्यांपुढे मांडली आहे ... शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकार आणि शेतकऱ्यांच्या कथित नेत्यांनी जो काही घोळ घातला आणि त्याचे आता जे परिणाम समोर येत आहेत ते पाहता या राज्यातल्या , देशातल्या शेतकऱ्यांना कधी न्याय मिळेल की नाही अशी शंका निर्माण होत आहे . आजवर या देशात , राज्यात शेतकऱ्यांची असंख्य आंदोलने झाली , परंतु ती सगळीच अयशस्वी ठरली क