प्रहार, रविवार, दि.24 ऑगस्ट 2014 ‘ दिल बहलानेके लिये ये खयाल अच्छा है ‘
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com रविवार , दि. 24 ऑगस्ट 2014 ‘ दिल बहलानेके लिये ये खयाल अच्छा है ‘ सुलतानाचा प्रकोप दरवर्षी झेलणाऱ्या शेतकऱ्यांवर यावर्षी आसमानही कोपल्याचे दिसत आहे. राज्यातील ज्या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे , नेमक्या त्याच भागात पावसाने डोळे वटारल्यामुळे भविष्यात इथली परिस्थिती खूपच बिकट होण्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत. विदर्भ आणि त्यातही पश्चिम विदर्भ तसेच संपूर्ण मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट पडल्याचे दिसते. महिनाभर उशिराने सुरू झालेल्या पावसाने मध्ये थोडी हजेरी लावल्यानंतर पुन्हा एकदा दडी मारली. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून या भागात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार , तिबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यात पुन्हा बोगस बियाण्यांनी अनेक शेतकऱ्यांना पार उद्ध्वस्त केले आहे. काही भागात पिके वर आली आहेत , परंतु त्यांना जगविण्यासाठी जवळच्या उपलब्