Posts

Showing posts from September, 2019
Image
'प्रहार' रविवार, दि.२२ सप्टेंबर  २०१९ देवेंद्रजी, शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच..! (लेखक : प्रकाश पोहरे - संस्थापक, किसान ब्रिगेड तथा मुख्य संपादक, दै.देशोन्नती) वस्तुस्थिती ही आहे की, वर्षानुवर्षांचे शेतकऱ्यांचे प्रश्न कर्जमाफी योजनेने सुटत नाहीत. त्यामुळे आता इथून पुढे कुठल्याही राजकीय पक्षाने कर्जमाफीचे गाजर दाखवून निवडणुका लढवल्यास ‘किसान ब्रिगेड’ त्या राजकीय पक्षाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर शेतकऱ्यांना समृद्ध करायचे असेल, तर अमेरिकेसारखे देश त्यांच्या शेतकऱ्यांना जशी सबसिडी देतात, तशी भारतीय शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालावर थेट सबसिडी द्या.कर्जमाफीसारख्या पोकळ उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना शेतकऱ्यांच्या पथ्यावर पाडा, असे ठणकावून सांगण्याची गरज आता निर्माण झाली आहे. मात्र, त्याकरिता मजबूत संघटना स्थापन करून सरकारवर दबाव आणून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे, हे शेतकरी जेव्हा समजून घेऊन कृती करतील तो दिवस शेतकरी मुक्तीचा दिवस म्हणून साजरा करण्यात येईल हे निश्चित.                      राज्यातील फडणवीस सरकारने जू