प्रहार, रविवार, दि. 15 जून 2014 शेतकरी आत्महत्यांची सुपारी घेतलिका ????
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com रविवार, दि.15 जून 2014 शेतकरीआत्महत्यांची सुपारी घेतलिका ???? लोकसभा निवडणुकीत जबर दणका बसल्यावरही राज्यातील आघाडी सरकारला कुठलीही जाग आल्याचे चित्र दिसत नाही. अर्थात अशी जाग येण्यासाठी सरकार जिवंत असायला हवे, सरकारमध्ये संवेदनशीलता असायला हवी. सतत पंधरा वर्षे सत्तेत राहिल्याने आघाडीला एकप्रकारची गुर्मी चढली आहे. आपण काहीही केले तरी जाब विचारणारा कुणी नाही, कसाही कारभार केला तरी शेवटी जातीपातीची गणिते आपल्यालाच साथ देतात आणि आपली सत्ता अबाधित राहते, या भ्रमात आघाडी सध्या वावरत आहे. सामान्य जनता चिडली म्हणजे ही सगळी गणिते कोलमडून पडतात, हे लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले; परंतु त्यातून शहाणपण घ्यायला आघाडी सरकार तयार दिसत नाही. लोकसभेत मोदींची लाट होती, विधानसभेत ती असणार नाही, त्यामुळे सत्तासुंदरी पुन्हा आपल्यालाच वरमाला घालेल, असा जबर, परंतु फुकाचा आत्मविश्वास आघाडीच्या नेत्यांमध्ये दिसून येत आहे. या राज्यात शेतकऱ्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या किमान 60 टक्के आहे, हा शेतकरीच कोणत्य