'प्रहार' रविवार, दि.१४ जुलै २०१९ समारंभातील ध्वनीप्रदूषणामुळे वैचारिक आदान-प्रदान थांबले....! (लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती) लग्न असो अथवा इतर कोणताही कार्यक्रम असो, तो ठरल्यावेळी पार कसा पडेल, शांततेने पार कसा पडेल याची काळजी आयोजकांनी घ्यायला हवी. अलीकडे तसे होत नसल्याचे दिसते. विशेषत: लग्न समारंभात अनावश्यक गोंधळच अधिक दिसून येतो. संवाद साधता येत नाही, शांततेने कुणाशी बोलता येत नाही, लग्नाची वेळ पाळली जात नाही. ध्वनीप्रदूषण हा तर मुद्दा आहेच; परंतु त्यासोबतच अपेक्षित वैचारिक देवाण-घेवाणीला जो अडथळा निर्माण होतो, तो अधिक काळजीचा विषय ठरतो. वैचारिक आदान-प्रदानातून सामाजिक बदल होत असतात, क्रांती होत असते. नवे विचार समाजात नव्या बाबी रूजवत असतात. हे वैचारिक आदान-प्रदान वेगवेगळ्या स्तरांवर होत असते. बहुजन समाजात कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांची अगदी रेलचेल असते. अशा कार्यक्रमांमध्ये लोक एकमेकांना भेटत असतात, विचारांचे आदान-प्रदान होते. कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचा हेतू कदाचित ½वेगवेगळा असेल; परंतु संवाद साधणे हा सामाईक भ
Posts
Showing posts from July, 2019
- Get link
- Other Apps
प्रहार रविवार, दि. ७ जुलै २०१९ प्रगती की अवनती? (लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती) १३५ कोटी लोकांची भूक भागवायची, तर जीएम, हायब्रीड, रासायनिक शेतीला पर्याय नाही, अशी मांडणी आजकाल केली जात आहे. अशा शेतीतून पिकलेलं अन्न-धान्य सकस असणारच नाही ही साधी गोष्ट आहे. पायाभूत सुविधा- जसे पाणी, भांडवल, मुक्त बाजारपेठ आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी किंमत उपलब्ध करून न देता नैसर्गिक शेतीचा प्रचार-प्रसार करणारी व्यवस्था ढोंगी आणि निखालस कपटी आहे. "मुँह में राम बगल में छुरी" घेऊन चालणाऱ्या व्यवस्थेत भोळ्याभाबड्या जनतेचे कॅन्सर, डायबेटीस, ब्लड प्रेशर इ. सारख्या रोगांनी असेच दिवसाढवळ्या मुडदे पडत रहाणार आहेत, कुठलाही योग किंवा आसने कामी येणार नाहीत. हा, योग शिकवणारे नक्कीच मोठे होतील हे सांगण्यासाठी कुठल्याही पंचांगाची गरज नाही. सगळा घोळ नफेखोरी, हरामखोरीने भरलेल्या दुटप्पी व्यवस्थेचा आहे आणि त्यासाठी या व्यवस्थेला डोक्यावर घेणारा पांढरपेशी वर्गच सर्वात जास्त जबाबदार आहे. नुकतेच यवतमाळ, वर्धा, गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये नवीन तुरुंग बांधण्यात येत