Posts

Showing posts from March, 2017

लुटण्यासाठी केवळ शेतकरीच... ! प्रहार रविवार, दि. 26 मार्च 2017

Image
प्रहार   रविवार , दि . 26 मार्च   2017            लुटण्यासाठी केवळ शेतकरीच ...! आज सगळेच शेतकऱ्यांना लुटायला निघाले आहेत , त्यात अर्थातच सरकार हा घटक सगळ्यात मोठा लुटारू आहे . काय तर म्हणे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार , कर्ज फेडण्याइतपत सक्षम करणार किंवा शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची वेळच येणार नाही , अशी परिस्थिती निर्माण करणार ; याचा अर्थ असा समजायचा का , की कर्ज घेण्यासाठी एकही शेतकरी जिवंतच राहणार नाही किंवा शेतामध्ये शेती करायला शेतकऱ्यांची पुढची पिढीच उरणार नाही , हे सरकारने स्पष्ट करावे . शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी गेले दोन आठवडे विधिमंडळाचे कामकाज होऊ दिलेले नाही . त्यातच सत्ताधारी पक्षाने विरोधी बाकांवरील 19 आमदारांवर निलंबनाची कारवाई करून कोंडी फुटण्याचे मार्ग आपल्याकडून बंद केल्याचे दिसून येत आहे . खरे तर हा सगळा पोरखेळ चालला आहे . शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायला हवी , त्यांचा सात - बारा कोरा व्हायला हवा यावर सगळ्या सभागृहाचे एकमत असेल , परंतु राज्य सरकार केंद